Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संवाद साधणार

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (08:05 IST)
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्या नंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हातात घेतला दरम्यान या सगळ्या घटना घडल्या नंतर उद्धव ठाकरे मात्र अधिक सक्रिय झाले आहेत. दिवाळी नंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये येणार आहेत. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सर्व बैठका उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होणार आहेत.
 
दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राज्यात ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्या मतदार संघातील प्रामुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
 
उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करत आहेत अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना फुटून शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. सद्यस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे 6 खासदार आहेत तर शिंदे गटाकडे 6 खासदार आहेत. दरम्यान शिंदे गटातील 12 खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर होणार आहेत.
 
जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना वेगळे करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि महाविकासआघाडीचे सरकार कोसळले दरम्यान आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments