Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तोपर्यत आघाडीला धोका नाही : उपमुख्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (15:55 IST)
प्रत्येक पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यातील सरकार स्थापनेचा निर्णय तिन्ही पक्षप्रमुखांचा. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही असं उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
आघाडीतील तिन्ही पक्षांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी त्यांचं काम करत आहेत. ही आघाडी तीन पक्षप्रमुखांनी स्थापन केली आहे. त्यामुळे या तीन नेत्यांचा जो पर्यंत पाठिंबा आहे, तोपर्यंत ही आघाडी स्थिर आहे, असं अजित पवार म्हणाले. जे विरोधक आहेत त्यांना तीन पक्षांचं सरकार आल्याचं पोट दुखणं बंद झालेलं नाही आहे, अशी टीका देखील अजित पवार यांनी केली.
 
तीन पक्षांचं सरकार आल्याचं पोटदुखी काही बंद झालेली नाही. त्यांना इतके दिवस वाटत होतं की हे सरकार आता पडेल, उद्या पडेल, आता दिड वर्ष होत आलं. काहीच होईना. म्हणून आता आरक्षण मुद्दा, मोर्चावरुन वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याची टिका अजित पवार यांनी केली

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments