suvichar

खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (10:17 IST)
राज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांग्चुक अशा तज्ज्ञ मंडळींना घेऊन आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आगामी काळात या बोर्डाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, अशी योजना आखल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांकडून घोकंपट्टी करून घेऊन त्यांची खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद करून कौशल्य शोधून ते विकसित करणारे शिक्षण महाराष्ट्रात दिले जाईल, असेही ते म्हणाले.राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या (स्वायत्त) दुसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. 
 
शिक्षणात केलेल्या बदलाबद्दल सांगताना तावडे म्हणाले, दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा पुढच्या वर्षांत संधी देण्याचा प्रयोग आपण यशस्वी केला. जूनमध्ये निकाल लागल्यानंतर जुलमध्ये परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावून ३५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तरीही जे अनुत्तीर्ण राहिले त्यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासाची संधी दिली व त्यांच्यावरील नापासाचा शिक्का पुसला असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

"रिक्षाचालकांनी १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकावी," महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांचे मोठे विधान

एसटी महामंडळाने 'तयार गणवेश' देण्याचा निर्णय घेतला; मात्र, कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवत 'शिलाई भत्ता' मिळावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला

LIVE: मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि लष्करी कार्यालय उडवून देण्याची धमकी

राजा रघुवंशी हत्या प्रकरण: मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला शिलाँग न्यायालयाने जामीन मंजूर केला

राज्यात उष्माघाताने ९ महिन्यांच्या बाळासह दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments