Festival Posters

चमत्कार नाही तर तंत्रज्ञान, मुंबई - पुणे फक्त ३० मिनिटात

Webdunia
राज्य सरकारने मुंबई-पुणे प्रवास सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, हा या वर्षीच्या २०१९च्या  अखेरपर्यंत सुरु होणार आहे. हे मोठे आणि महत्वाचे  काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा चमत्कारच ठरणार आहे. 
 
मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त  25 मिनिटात पूर्ण  करता येणार आहे. अर्थात  मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत.  पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून,  या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

नबीचा उद्धटपणा, सामन्यादरम्यान पंचांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याने दंड

ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमधील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले; महापौर आणि उपमहापौरांची संपूर्ण यादी येथे पहा

विद्येच्या मंदिरातच वासनेचा नंगानाच! लोहारातील सरकारी शाळेत शिक्षकांकडून २४ विद्यार्थिनींचा विनयभंग

नातं काळवंडलं! जावयासोबत पळालेल्या सासूचा आता मेहुण्यावर जीव जडला; १० महिन्यांत दोनदा पळाली

पुढील लेख
Show comments