Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीला पुन्हा इशारा कृष्णा नदीची पातळी वाढली, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:15 IST)
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे  उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली होती, मात्र त्यात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागातील  नागरिकांची पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे सांगलीत पाण्याची पातळी  पुन्हा  वाढणार आहे. शहरातील असलेल्या आयर्विन पुलाजवळ सध्या 10 फूट 6 इंच पाणी पातळी आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास ती पाणी तापळी 34 फूटावर वाढणार आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्यात. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments