Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कल्याण आणि बदलापूरला पाण्याचा वेढा, वीज पुरवठा बंद

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (21:59 IST)
मुंबई आणि उपनगरांनाही पावसाने झोडपून काढलं आहे. यात कल्याण आणि बदलापूर शहराला पाण्याने वेढा घातला आहे. कल्याणमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावरही झाला आहे. निर्माण झालेली पुरजन्य परिस्थिती पाहता महावितरणतर्फे 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. 
 
महावितरणच्या कल्याण परिमंडळ 1 अंतर्गत बारावे इथून निघणाऱ्या मुरबाड रोड, शहाड, योगीधाम, घोलप नगर परिसरातील 80 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. तर तेजश्री येथून निघणाऱ्या पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील 9 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आले आहे. मोहने फिडरवरील 20 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे. या सर्व परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी कमी होईल त्यानुसार या बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments