Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोलापूरसाठी 10 एप्रिलला उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:11 IST)
एकीकडे कोरोना विषाणूच संकटाला जनता सामोरे जात असताना दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडून शहरावर पाणीटंचाईची शक्यता  निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेच्या मागणीनुसार येत्या 10 एप्रिलला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

शहराला उजनी-सोलापूर आणि टाकळी-सोलापूर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, भीमा नदीवरील औज बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडला असून टाकळी व चिंचपूर बंधार्‍याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागत आहे. आगामी जलसंकट ओळखून महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. 8 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडून 18 एप्रिलपर्यंत टाकळीला पाणी पोहोचेल, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाने 10 एप्रिलला पाणी सोडणांर असल्याचे सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments