suvichar

सोलापूरसाठी 10 एप्रिलला उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:11 IST)
एकीकडे कोरोना विषाणूच संकटाला जनता सामोरे जात असताना दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडून शहरावर पाणीटंचाईची शक्यता  निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेच्या मागणीनुसार येत्या 10 एप्रिलला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

शहराला उजनी-सोलापूर आणि टाकळी-सोलापूर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, भीमा नदीवरील औज बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडला असून टाकळी व चिंचपूर बंधार्‍याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागत आहे. आगामी जलसंकट ओळखून महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. 8 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडून 18 एप्रिलपर्यंत टाकळीला पाणी पोहोचेल, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाने 10 एप्रिलला पाणी सोडणांर असल्याचे सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments