Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (14:57 IST)
शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करताना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३वर पोहोचली आहे. या घडामोडींवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
 
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी गजानन कीर्तिकरांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शिवसेना सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वाक्यात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

नागपूरच्या रुग्णालयात जीबीएसमुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू

क्रिकेट खेळतांना शिक्षकाच्या गाडीची काच फुटली, ७२ विद्यार्थ्यांना केले निलंबित

LIVE: महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद कायदा आणणार, 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले

महाराष्ट्र सरकार ने लव्ह जिहाद कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले

महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायद्यावर संजय राऊतांनी केली टीका

पुढील लेख
Show comments