Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरवाजांचे तांत्रिक काम सुरू असताना राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (21:42 IST)
कोल्हापूरमधील राधानगरी धरणाच्या दरवाजांचे तांत्रिक काम सुरू असताना एक दरवाजा उघडून अडकल्याची घटना घडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी नदी काठावरील गावांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारे धरण म्हणून राधानगरी धरणाची ओळख आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो. दरम्यान सर्व्हिस गेटचे काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला. त्यानंतर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
 
दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पंचगंगा नदीमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी नदी परिसरात जाऊ नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.  

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments