Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोजगार देणे तर दूरच, असलेले रोजगार काढून घेण्याचे काम सुरू आहे –जयंत पाटील

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2019 (10:04 IST)
पंचेचाळीस वर्षांत घडले नाही ते आज मोदी सरकारच्या काळात घडत आहे. रोजगार देणे तर दूरच पण असलेले रोजगार काढून घेण्याचे काम मोदी सरकार करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. देशात वर्षाला दोन कोटी रोजगार येण्यासाठी हे सरकार गुंतवणुकीत अपयशी ठरले आहे. विकासाच्या नावाखाली अनेक युवक अजूनही बेरोजगार आहेत. बेरोजगारीचा खरा चेहरा लपवण्यासाठी अहवाल प्रकाशित करण्यासाठी या सरकारने मज्जाव केला होता.भाजपाने देशवासीयांना विकासाची गाजरे दाखवली आणि देशाचा जपान करण्याच्या नादात नेपाळ करून ठेवला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’या वाक्याला जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच चौकीदाराची भूमिका दिली आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments