Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणतल्या गणेशोत्सवासाठी १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार

Webdunia
बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (09:09 IST)
मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावात जातांना आता १४ दिवसांच्या ऐवजी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना आता १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. १२ ऑगस्ट आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन मार्गदर्शक सूचना सांगितल्या. १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना स्वॅब टेस्ट बंधनकारक असणार आहे. स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास स्थानिक प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. तर एसटीने जाणाऱ्यांसाठी ३ हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 
 
एसटीची सुविधा उपलब्ध करुन देतानाच अनिल परब यांनी नियमावलीही सांगितली आहे. एसटी प्रवासात सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यासाठी एका एसटीत केवळ २२ प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल. जर २२ जणांनी मिळून एक एसटीचे ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावात सोडले जाईल. एसटीने प्रवास करणाऱ्यांना एसटीत जेवण करावे लागणार आहे.
 
एसटीमध्ये २२ प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असल्यामुळे खासगी बसचालक जादा दराने तिकीट विक्री करत आहेत. त्यावरही नियंत्रण आणले असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीच्या दीडपट अधिक भाडे खासगी बसचालक आकारू शकतात. त्याहून अधिक बसभाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments