Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

5 गोष्टी ज्याने मुलांच्या मनात भावंडांबद्दल आदराची भावना निर्माण होईल

Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (11:12 IST)
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत- नकळत कुटुंबात असे वातावरण निर्माण होते की एकतर भाऊ आपल्या धाकट्या किंवा मोठ्या बहिणीला हीन समजू लागतो किंवा बहिणीला भावाला मान देण्याऐवजी इतरांसमोर त्याचा अपमान करू लागतो. अशा परिस्थितीत, हे सुंदर छोटे नाते कटुतेने भरू लागते. मग ते एकमेकांना संबोधणे, एखाद्या कामात मदत करणे किंवा सामान्य दैनंदिन जीवनात, जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच काही सवयी भाऊ-बहिणीत रुजवायला हव्यात. या सवयी अंगीकारून ते या नात्याचा आदर तर वाढवतीलच शिवाय इतरांसाठी प्रेरणाही बनतील. जाणून घ्या अशा 5 गोष्टी ज्यामुळे तुमच्या मुलांच्या मनात त्यांच्या भावंडांबद्दल आदराची भावना निर्माण होईल.
 
ताई किंवा दादा बोलण्याची सवय लावा- 
मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात. अनेक घरांमध्ये असे घडते की, घरातील वडीलधारी मंडळी, मुलांना ज्या नावाने हाक मारतता तेच नाव मुलांच्या लहान भावांना किंवा बहिणींनाही घेण्याची सवय लागते. उदाहरणार्थ, एखाद्या घरात त्या घरातील मोठ्या मुलीला नावाने हाक मारली जाते, तर त्या मुलीचा धाकटा भाऊही तिला नावाने हाक मारायला लागतो आणि त्याची सवय होऊन जाते. लहानपणी हे गोंडस वाटत असलं तरी मोठे झाल्यावर कधी कधी विचित्र वाटते. तेही भाऊ किंवा बहीण वयाने मोठे झाल्यावर. त्यामुळे जर घरातील लहान मुलाला मोठ्या भावाला किंवा बहिणीला ताई किंवा दादा म्हणायला शिकवावे लागत असेल तर घरातील इतर मोठ्यांनी शक्यतो तेच उदाहरण त्याच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 
तुलना टाळण्याची सवय लावा- 
घरात दोन मुले असतील तर त्यांची तुलना करणेही घातक ठरू शकते. देखावा, अभ्यास, खेळ यांची कोणतीही तुलना चुकीची आहे. प्रत्येक मूल वेगळे असते आणि प्रौढांनी हे समजून घेतले पाहिजे. तुलना केल्यास लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड, निराशा, आणि राग यासारख्या भावना घरा करु शकतात. त्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते बिघडते, मोठे झाल्यावरही कधी कधी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो. कधी कधी असे घडते की दोन भाऊ किंवा बहिणी एकाच शाळेत शिकतात तेव्हा शिक्षक त्यांच्यात तुलना करू लागतात. त्यामुळे मुलांच्याही मनात श्रेष्ठ असल्याची भावना निर्माण होते. अशात मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगा आणि त्यांना समजावून सांगा की त्यांनी स्वतःचे गुण विकसित करण्यावर भर द्यावा. त्यांना एकमेकांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. किमान त्यांना या अनिष्ट परिस्थितीवर मात करण्यासाठी कुटुंबात वातावरण द्या. घरातील असो वा नात्यात, भाऊ-बहिणीत तुलनेचा द्वेष कधीही येऊ देऊ नका.
 
कामाचे समान वाटप करा- 
जर तो मुलगा असेल तर तो घरची कामे करणार नाही आणि जर तो मुलगी असेल तर तो बाहेरचे काम करायला जाणार नाही. या भेदभावामुळे भावंडांमध्ये संघर्ष आणि लैंगिक असमानता निर्माण होऊ शकते. विशेषत: आजच्या वातावरणात जेव्हा मुले केवळ शहरातूनच नव्हे तर देशाबाहेरही अभ्यास आणि नोकरीसाठी जातात, तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व कामे शिकवणे अधिक महत्त्वाचे होते. मुलाने कणिक मळायला शिकणे असो किंवा मुलीला गाडीची स्टेपनी बदलायला शिकवणे असो. हे काम त्यांच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. त्यामुळे थकून घरी आलेल्या भावाला एक ग्लास पाणी देण्याची सवय तुम्ही बहिणीला लावत असाल तर तीच सवय भावालाही लावा. प्रत्येक गोष्ट दोघांमध्ये समान रीतीने विभागून घ्या जेणेकरून कोणीही तक्रार करू नये.
 
प्रेम आणि सवय- 
अनेक घरांमध्ये असे घडते की, मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरात जाईल, म्हणून तिला अतिरिक्त सुविधा देऊन तिचे लाड केले जातात. यासाठी भावाला गैरसोय सहन करावी लागली तरी चालेल. दुसरीकडे, अविवाहित भावांना जेव्हा मुलगी लग्नानंतर तिच्या माहेरच्या घरी येते तेव्हा त्यांच्या दिनचर्येशी आणि सोयी-सुविधांसह सर्व प्रकारची तडजोड करण्यास सांगितले जाते. या परिस्थितीमुळे भावंडांमधील अंतर वाढू शकते. मुलं एक-दोनदा तडजोडही करतात, पण जेव्हा ही परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवते तेव्हा मनात कटुता येऊ लागते. त्यामुळे लहानपणापासूनच दोन्ही मुलांमध्ये समान प्रेमाची सवय लावा. तुमचे प्रेम दोघांसाठी समान आहे हे त्यांना समजावून सांगा, ज्या काही सुविधा आहेत, त्या दोघांसाठी समान असाव्यात हेही लक्षात ठेवा. यातून ते समेट घडवायला आणि एकमेकांसाठी आनंदाने त्यांच्या सुविधा शेअर करायलाही शिकतील.
 
राखी- भाऊबीज सारख्या सणांचे महत्व समजावून सांगा- 
सण हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भावनांशी निगडित नसतात. सण माणसाच्या विचारसरणी, सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती तसेच व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता आणतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी मूल्यांचा अभाव ही एक मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचे तसेच भाऊबीज या सारख्या सणांचे महत्त्व मुलांना समजावून सांगा. त्यांना सांगा की हा सण केवळ रक्ताच्या नात्याशी जोडलेला नाही तर मानवी मूल्यांशीही जोडलेला आहे. यामध्ये सुरक्षेची आणि नातेसंबंधांची जबाबदारी दोन्ही भावंडांना बरोबरीने पार पाडावी लागते. ही भावना लहानपणापासून मुलांमध्ये ठेवली तर मोठी झाल्यावरही ही भावना मनात ठेवून ते एकमेकांशी जोडले जातील.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

पुढील लेख
Show comments