Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी संप : पूर्ण राज्यात प्रथमच शेतकरी संपावर

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:56 IST)
आज पर्यंत अनेक कामगार आपण संपावर गेलेला पाहिले आहे. मात्र शेतकरी कधीही संपावर गेला नव्हता. मात्र तसे झाले या २०१७ वर्षात १ जूनपासूनच्या शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली होती. यामध्ये दुधाचा ट्रक थांबून त्यातून दुध हे जमिनीवर टाकले होते. शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून धरीत वारणा दूध डेअरीच्या दोन ट्रकची तोडफोड केली.कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देणे शक्य होणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मुंबईला जाणारे भाजीपाला व दुधाचे टँकर रोखण्यासाठी संपकरी  तयार झाले होते. शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रहर संघटना, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शेतकरी संपात सहभाग नोंदवला होता.नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद येथून जाणारा भाजीपाला व दूध यांची वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी, इगतपुरी येथे अडवायची, नगर, बीड, पुणे जिल्ह्यातील वाहने माळशेज घाटात, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथून येणारी वाहने पुणे आणि लोणावळा शहराच्या अलीकडे अडवायची असे नियोजन करत संप सुरु केला होता.
 
शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या जवळपास ८ दिवसानी पूर्व पदावर येत होत्या.नवी मुंबईत महाराष्ट्रातूनच ५० टक्के गाड्या आल्यायत.  संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झालीयत. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही उतरायला लागले होते. संपाच्या काळात तुटवड्यामुळे भाज्यांचे वाढ कमालीचे वाढले होते.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला प्रती लिटर ५० रुपये भाव द्या व इतर मागण्या शेतकरी संघटनांनी लावून धरल्या होत्या. शेतकरी कर्ज माफी करत हा शेतकरी संप मागे घेण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कुणाल कामरा यांना देशविरोधी संघटनांकडून 4 कोटी रुपये मिळाल्याचा शिवसेना नेते निरुपम यांचा मोठा आरोप

CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी नवीन अभ्यासक्रम जारी केला

आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत

कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले, अपघातात 7 जखमी

म्यानमारमध्ये पुन्हा 5.1 तीव्रतेचा भूकंप आला; आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments