Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्राध्द केले की कावळ्यासच का खाऊ घातले जाते.. या मागील शास्त्रीयदृष्ट्या हेतू

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (10:53 IST)
जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच  वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवां साठी व  जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
 
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.
 
या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे  फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला  ? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच  "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.
 
आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान"होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे  ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं  "पितृपक्ष"  आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व आति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते. . 
 
खबरदार जर कोणी "आपल्या" प्रथांची टींगल केली ? आणि "ऐकून"+ "पाहून" सहन केली  तर ? त्याचे पण त्याच्याचच  समोर "श्राध्द" करा  ? 
 
नाही तरी "कोरोनाने"  मागे "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व  समाजाला पटवून दिलेच आहे.  जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नै मिळाले ? तर आपल्या मागील  "वंशाचे" नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ?  कधीच ? व कुठेही ? कोणतेही ? सरकार "आँक्सीजनची" पुर्व तयारी करा ? हे सांगणार नाही ?  हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा..... 
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

The importance of Tulsi तुळशीचे महत्त्व!

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

पुढील लेख
Show comments