Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजेटच्या आधी हलवा का तयार होतो?

Webdunia
शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:19 IST)
येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीतील अर्थमंत्रालयात हलवा तयार करून अर्थसंकल्पाच्या छपाईचा श्रीगणेशा करण्यात आला.
 
दर वर्षी हलवा बनवण्याची परंपरा असून त्यानंतरच संसदेत बजेट प्रस्तुत केलं जातं. यावेळी अर्थमंत्री हा हलवा आपल्या विभाग वाटतात. यानंतरच अधिकृत रीत्या बजेट छपाईसाठी पाठवण्यात येतं. 
 
हलवा सेरेमनी बजेट येण्याच्या दहा दिवस आधी साजरी होते. गेली अनेक वर्ष अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळला जात आहे. यात एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, अर्थ सचिव यांच्या उपस्थित सर्वांचे हलव्याने तोंड गोड करून अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जाते. कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात ही गोडधोड करून करावी, अशी भारतीय संस्कृती आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळण्यात येतो. भारतीय संस्कृती हलवा शुभ मानला गेला आहे.
 
यंदा सीतारामन दुसऱ्यांदा बजेट सादर करतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार असून ते 11 फेब्रुवारीपर्यंत चालू राहील. दुसऱ्या टप्प्यात 2 मार्च ते 3 एप्रिल या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा असेल.
 
हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्थ मंत्रालयात इतरांना प्रवेश दिला जात नाही. हलवा वाटप झाल्यावर अर्थ मंत्रालयाच्या अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. त्यांना पूर्ण दुनियेपासून वेगळं राहवं लागतं. हे कर्मचारी बजेटची प्रिंटिंग करतात. बजेट छपाई प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते बजेट संसदेत प्रस्तुत होयपर्यंत यांना कोणाशीही संपर्क करण्याची परवानगी नसते. त्यांना फोन करण्याची देखील परवानगी नसते. कोणालाही त्यांची भेट घेता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील जवळीक वाढू लागली

शिर्डीचे पावित्र्य अधोरेखित करत ते राजकीय कार्यक्रमांपासून मुक्त ठेवण्याचा आग्रह संजय राऊतांनी केला

पुणे जिल्ह्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

ठाणे आणि उत्तर प्रदेशमधील जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंची शिवसेना साक्षीदार झाली

‘अफवांवर लक्ष देऊ नका’, मंत्री अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केले आवाहन

पुढील लेख
Show comments