Marathi Biodata Maker

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:22 IST)
भारतात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. आता या बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी सरकार कडून पाऊले उचलली जात आहे. वास्तविक, सरकार बेरोजगार व्यक्तींना बेरोजगारी भत्ता देते जेणेकरून त्यांना फायदा मिळेल.आता बेरोजगारांना मदत करण्यासाठी सरकारने अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना सुरू केली आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ चालवते.
 
* अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना योजनेअंतर्गत ज्या बेरोजगारांनी नोकरी गमावली आहे. त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीसाठी भत्ता दिला जातो. बेरोजगार व्यक्ती या योजनेअंतर्गत तीन महिन्यांसाठी लाभ घेऊ शकतो. या योजनेद्वारे तो 3 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के दावा करू शकतो. नोकरी गमावल्यानंतर 30 दिवसांनी एखादी व्यक्ती या योजनेसाठी दावा करू शकते.पुढाकार सरकारने चालवलेली ही योजना 30 जून 2021 पर्यंत लागू होती, परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता 30 जून 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 
* या योजनेचा लाभ कसा घ्यावा
अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी ESIC शी संबंधित कर्मचारी ESIC च्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. यानंतर ESIC आपल्या  अर्जाची पुष्टी करेल, जर अर्ज योग्य असेल तर रक्कम आपल्या खात्यात पाठवली जाईल.
 
* योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो
 
या योजनेचा फायदा खासगी सेक्टरमध्ये काम करणारे नोकरदार लोक बेरोजगार झाल्यावर  घेऊ शकतात. प्रत्येक महिन्याला त्यांच्या कंपनीकडून पगारातून पीएफ कापला जातो.
 
याचा फायदा घेण्यासाठी, ESI कार्ड बनवले जाते,कर्मचारी या कार्डाच्या आधारे किंवा कंपनीकडून आणलेल्या कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी किंमतीसाठी उपलब्ध आहे.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकर पुरस्कार नाकारला

GDB संशोधन: भारतातील ३०% पेक्षा जास्त महिलांना बालपणातील लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

बिबट्याचा धुमाकूळ, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

पुढील लेख
Show comments