Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:22 IST)
भारतात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. आता या बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी सरकार कडून पाऊले उचलली जात आहे. वास्तविक, सरकार बेरोजगार व्यक्तींना बेरोजगारी भत्ता देते जेणेकरून त्यांना फायदा मिळेल.आता बेरोजगारांना मदत करण्यासाठी सरकारने अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना सुरू केली आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ चालवते.
 
* अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना काय आहे
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना योजनेअंतर्गत ज्या बेरोजगारांनी नोकरी गमावली आहे. त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीसाठी भत्ता दिला जातो. बेरोजगार व्यक्ती या योजनेअंतर्गत तीन महिन्यांसाठी लाभ घेऊ शकतो. या योजनेद्वारे तो 3 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के दावा करू शकतो. नोकरी गमावल्यानंतर 30 दिवसांनी एखादी व्यक्ती या योजनेसाठी दावा करू शकते.पुढाकार सरकारने चालवलेली ही योजना 30 जून 2021 पर्यंत लागू होती, परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता 30 जून 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 
* या योजनेचा लाभ कसा घ्यावा
अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी ESIC शी संबंधित कर्मचारी ESIC च्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. यानंतर ESIC आपल्या  अर्जाची पुष्टी करेल, जर अर्ज योग्य असेल तर रक्कम आपल्या खात्यात पाठवली जाईल.
 
* योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो
 
या योजनेचा फायदा खासगी सेक्टरमध्ये काम करणारे नोकरदार लोक बेरोजगार झाल्यावर  घेऊ शकतात. प्रत्येक महिन्याला त्यांच्या कंपनीकडून पगारातून पीएफ कापला जातो.
 
याचा फायदा घेण्यासाठी, ESI कार्ड बनवले जाते,कर्मचारी या कार्डाच्या आधारे किंवा कंपनीकडून आणलेल्या कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी किंमतीसाठी उपलब्ध आहे.
 
 
 

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments