rashifal-2026

Dr. Babasaheb Ambedkar यांचे प्रेरक विचार

Webdunia
गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (10:19 IST)
(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.
 
(२) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
 
(३) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
(४) वाचाल तर वाचाल.
 
(५) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.
 
(६)  मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
(७) तिरस्कार माणसाचा नाश करतो.
 
(८) ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.
 
(९) शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
 
(१०) शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.
 
(११ ) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
 
(१२ ) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
 
(१३ ) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
(१४) ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
 
(१५ ) वाणी व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. त्यासाठी मनाला संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
 
(१६) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
(१७ ) पती- पत्नी मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
 
(१८) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
 
(१९) तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 
(२०) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
(२१) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
 
(२२ ) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
 
(२३) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
(२४) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.
 
(२५) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27: चित्रपट उद्योगाला थेट दिलासा मिळाला नाही, परंतु सरकार सर्जनशील क्षेत्रावर मोठा भर देण्याचे संकेत

अर्थसंकल्पात 7 नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

बलुचिस्तानमध्ये लष्कराची कारवाई, 67 दहशतवाद्यांचा खात्मा

एलेना रायबाकिना आर्यना सबालेंला पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरली

पुढील लेख