Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदुत्वाच्या विरोधकांना देशद्रोही ठरवलं जातं- नयनतारा सहगल

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2019 (10:46 IST)
प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही असं नयनतारा सहगल म्हणाल्या.
 
प्रतिगामी विचार करणाऱ्या नवीन भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे.
 
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं असं साहित्यिक नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.  
 
आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त नयनतारा यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
"मतं मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे.सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्व मानणारे आणि न मानणारे अशी आहे," त्या पुढे म्हणाल्या.
 
एकीकडे सगळ्यात मोठी लोकशाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची हे विसंगत आहे, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित माहिती

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments