"पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं," असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
हरियाणामधल्या सभेत ते बोलत होते.
संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन चीननं हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, असं राहुल यांनी म्हटलं.