Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (09:44 IST)
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे.
 
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या.
 
पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments