Dharma Sangrah

रहस्यमयी गढकुंदर किल्ला मध्यप्रदेश

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)
India Tourism : भारतामध्ये अनेक शूरवीर राजांनी महाराजांनी शासन केले आहे. तसेच शासन काळात अनेक गढ, किल्ले उभारण्यात आले जे आज देखील भक्कमपणे उभे राहून इतिहासाची साक्ष देतात. भारतातील प्राचीन किल्ल्यांचा इतिहास आणि वास्तुकला जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो किल्ले बांधलेले आहे. त्याचबरोबर असे किल्ले आहे ज्यांच्या इतिहासाबद्दल किंवा बांधकामाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भारतात असा एक रहस्यमयी किल्ला आहे. या किल्ल्याबद्दल असे सांगितले जाते की येथे लग्नाची मिरवणूक बेपत्ता झाली होती आणि आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. 
 
भारतातील या रहस्यमय किल्ल्याचे नाव गढकुंदर किल्ला आहे जो 1500 ते 2000 वर्षे जुना मानला जातो. या किल्ल्यावर चंदेल, खंगार अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे. हा किल्ला मध्य प्रदेशातील निवाड़ी जिल्ह्यातील एका छोट्या गावात आहे.
 
रहस्यमय या किल्ल्याला पाच मजले आहे पण त्यातील दोन मजले जमिनीखाली आहे. हा किल्ला कधी आणि कसे बांधला याबाबत ठोस पुरावे नाही.
 
तसेच हा किल्ला भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांमध्ये गणला जातो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, एकदा जवळच्या गावातून लग्नाची मिरवणूक या किल्ल्यावर आली होती. लग्नाची मिरवणूक या गडाला भेट देण्यासाठी आली असता तळघरात भटकत तो अचानक गायब झाली. आजपर्यंत या मिरवणुकीचा शोध लागलेला नाही असे सांगण्यात येत आहे. यानंतर अशा घटनेमुळे किल्ल्याचा खालचा भाग बंद करण्यात आला.
 
तसेच किल्ल्याची विशेषतः म्हणजे गडकुंदर किल्ला एखाद्या भूलभुलैयापेक्षा कमी मानला जात नाही. किल्ल्याच्या जास्त आत गेल्यास रस्ता चुकू देखील शकतो असे येथील स्थानिक नागरिक सांगतात. गडावर दिवसाही अंधार असतो. तसेच असे मानले जाते की किल्ल्यात एक खजिना लपलेला आहे, जो शोधण्यासाठी लोक गेले आणि आपला जीव गमावला. पूर्वीच्या काळी सोन्या-चांदीचे दागिनेही खालच्या मजल्यावर ठेवले जायचे त्यामुळे लोक खाली जाऊ लागले. जी नंतर बंद करण्यात आली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments