Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रूपकुंड सरोवर: भारताच्या या सरोवरात मासे नाहीत, सांगाडे तरंगतात

Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (15:58 IST)
तलावाचे नाव येताच अतिशय सुंदर पाण्याने भरलेल्या ठिकाणाचे चित्र डोळ्यासमोर येते. लोकांना तलावाजवळ बसून थोडा वेळ आराम करायला आवडते. त्याच वेळी, काही लोकांना तेथे मासे पकडणे देखील आवडते. पण तुम्ही कधी अशा तलावाची कल्पना केली आहे का ज्यामध्ये माशांऐवजी सांगाडे पोहताना दिसतात. हे ऐकायलाच खूप अद्भुत आहे. असेच एक सरोवर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे, रूपकुंड तलाव सुमारे 16,500 फूट उंचीवर म्हणजेच समुद्रसपाटीपासून 5,029 मीटर उंचीवर आहे. हे सरोवर हिमालयाच्या तीन शिखरांच्या मध्ये वसलेले आहे, जे त्यांच्या त्रिशूळ सारख्या स्वरूपामुळे त्रिशूल म्हणून ओळखले जाते.ज्याला रूपकुंड तलाव म्हणूनही ओळखले जाते. लोक त्याला स्केलेटन लेक असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
ग्लेशियर लेक म्हणजे रूपकुंड तलाव -
रूपकुंड सरोवर, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित आहे, प्रत्यक्षात एक हिमनदी आहे, सुमारे 5,029 मीटर उंचीवर आहे. त्यामुळेच येथे पाण्याऐवजी फक्त बर्फच दिसतो. पण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा शेकडो मानवी सांगाडे पाण्यात किंवा सरोवरात पृष्ठभागाखाली तरंगताना दिसतात.
 
हे सांगाडे कोणाचे आहे
हे मानवी सांगाडे नेमके कोणाचे आहे, याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. जेव्हा तलावाचा शोध लागला तेव्हा असे मानले जात होते की हे अवशेष या भागात घुसलेल्या जपानी सैनिकांचे आहेत. मात्र, नंतर तपासाअंती असे आढळून आले की, हे मृतदेह जपानी सैनिकांचे असू शकत नाहीत, कारण ते खूप जुने आहेत. 1960 च्या दशकात गोळा केलेल्या नमुन्यांवरून, ते 12 व्या शतकापासून 15 व्या शतकातील असल्याचा अंदाज लावला गेला.
 
 रूपकुंड नाव कसे पडले -
एकीकडे हा तलाव बघायला खूप भयावह असला तरी त्याचे रूपकुंड हे नाव नक्कीच आश्चर्यकारक आहे. मात्र, या तलावाच्या नावाबाबत अशीही एक मान्यता आहे की, हा तलाव भगवान शिवाने त्यांची पत्नी पार्वतीसाठी निर्माण केला होता. अशी आख्यायिका आहे की देवी पार्वती आपल्या माहेरून सासरच्या घरी जात असताना वाटेत तिला तहान लागली आणि त्यांनी भगवान शंकरांना तिची तहान भागवण्यास सांगितले. मग भगवान शिवाने माता पार्वतीची तहान शमवण्यासाठी त्याच ठिकाणी आपल्या त्रिशूळाने एक तलाव बांधला. यानंतर माता पार्वतीने त्या तलावाचे पाणी प्यायले. त्यावेळी मातेची पाण्यात पडणारी सुंदर प्रतिमा पाहून या तलावाला शिवाने रूपकुंड असे नाव दिले.
मानववंशशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ जवळजवळ अर्ध्या शतकापासून या सांगाड्यांचा अभ्यास करत आहेत. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि हा तलाव त्यांच्या कुतुहलाचे कारण बनले आहे. 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments