Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भानगड हे उत्तर भारतातील सर्वात भयानक ठिकाण का आहे, जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 6 मे 2022 (16:29 IST)
राजस्थान वाळवंटाच्या मध्यभागी वसलेले एक सुंदर भारतीय राज्य. या राज्याचे नाव ऐकताच सर्वांत प्रथम आलिशान राजवाडे, जगप्रसिद्ध किल्ले आणि एक उत्तम राजवाडा इत्यादींचे नाव डोळ्यासमोर येते. हे असे राज्य आहे जिथे दर महिन्याला लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. विशेषत: लोक जगप्रसिद्ध किल्ले पाहण्यासाठी पोहोचतात.
 
पण या राज्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांची गणना सर्वात भीतीदायक ठिकाणांमध्येही केली जाते. यापैकी एक म्हणजे भानगड किल्ला. रात्र सोडा, अनेक वेळा दिवसा उजेडातही लोक एकटे फिरायला जाण्यास घाबरतात. हा किल्ला उत्तर भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. या लेखात ते भितीदायक ठिकाणांमध्ये का समाविष्ट केले आहे आणि त्यामागील कथा काय आहे ते जाणून घेऊया.
 
भितीदायक काय?
भानगड किल्ल्याची कथा राजस्थानातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की अनेक त्रासदायक कारणांमुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे लोक सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी कोणालाही या किल्ल्यात प्रवेश देत नाहीत. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की येथे एक विचित्र जाणीव होते आणि असे दिसते की कोणीतरी त्यांचा पाठलग करीत आहे. किल्ल्यावरून आरडाओरडा, रडणे, बांगड्यांचे आवाजही ऐकू येतात असा अनेकांचा समज आहे.
 
एखाद्या साधूने खरच शाप दिला का?
याबद्दल कुठलाही दावा केला नसला तरी अनेक लोकांचा असा विश्वास आहे की हा किल्ला एका साधूचा शाप आहे. या कथेबद्दल असे म्हटले जाते की साधूने किल्ल्याच्या राजासमोर काही अटी ठेवल्या, परंतु राजा त्या अटी पूर्ण करू शकला नाही आणि साधूने शाप दिला. या घटनेनंतर त्यावेळीही लोक जायला घाबरत होते.
 
सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी जाण्यास मनाई
तसे, रात्री भानगड किल्ल्यात जाण्यास पूर्पणे मनाई आहे. पण भारतीय पुरातत्व विभागाचे लोक संध्याकाळ होताच पर्यटकांना बाहेर काढायला सुरुवात करतात. सूर्यास्तापूर्वी सर्व लोकांना गडाबाहेर हाकलून दिले जाते. याशिवाय सूर्योदयापूर्वी या किल्ल्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. असे म्हणतात की जो कोणी या किल्ल्यात रात्री मुक्काम करण्यासाठी गेला तो दुसऱ्या दिवशी काय घडलं हे सांगण्यासाठी परत आला नाही.
 
कोणी गडावर राहण्याचा प्रयत्न केला आहे का?
भानगड किल्ल्याशी संबंधित अनेक रंजक कथा आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, असे म्हटले जाते की एकदा तीन मित्रांनी येथे राहण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना हे जाणून घ्यायचे होते की ते खरोखर एक भितीदायक ठिकाण आहे का. असे म्हणतात की त्यांनी रात्र काढली, परंतु दुसऱ्या दिवशी ते किल्ल्यावरून घरी जात असताना रस्त्याच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
 
भानगड किल्ल्याचा इतिहास
भानगड किल्ला राजस्थानच्या अलवरमध्ये आहे. हा किल्ला 17 व्या शतकात मानसिंग पहिला याने बांधला होता. मानसिंग प्रथम याने ते त्याचा भाऊ माधोसिंग प्रथम याच्यासाठी बांधले असे म्हणतात. माधो सिंग हे त्यावेळी अकबराच्या सैन्यात जनरल म्हणून तैनात होते.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments