Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्मला सीतारमण यांनी कोरोना लसीविषयी ही मोठी माहिती दिली, काय म्हणाल्या ते जाणून घ्या?

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (14:03 IST)
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस (corona vaccine)देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला 
सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 
बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.
 
बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल त्यांना योग्य माहिती आहे. कोणी आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला योग्य उत्तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचं आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं सीतारामान यांनी यावेळी म्हटलं आहे.

<

As soon as #COVID19 vaccine will be available for production at a mass scale, every person in Bihar will get free vaccination. This is the first promise mentioned in our poll manifesto: Union Minister Nirmala Sitharaman at the launch of BJP Manifesto for #BiharPolls pic.twitter.com/x4VjVmkA3Q

— ANI (@ANI) October 22, 2020 >काय काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात
१) कोरानाची लस (corona vaccine) आल्याबरोबर निःशुल्क देणार
२) मेडीकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
३) ३ लाख शिक्षकांची भरती करुन घेणार
४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
७) बिहारमधील दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
८) धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार
९) २०२२ पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार
११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments