Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षयचा आगामी चित्रपट शेतकर्‍यांवर आधारित

Webdunia
सोमवार, 7 मे 2018 (13:57 IST)
अभिनेता अक्षयकुार आता देशातील शेतकर्‍यांवर चित्रपट काढणार आहे. देशात होणार्‍या शेतकरी आत्महत्या, त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्र्न यावर दिशा दाखवणारा अक्षयचा आगामी चित्रपट असणार आहे. यातून एक सामाजिक संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नावही त्याने जाहीर केले. नुकत्याच झालेल्या न्यू इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात अक्षयकुमारने हजेरी लावली होती. आपला आगामी चित्रपट शेतकरी आणि गावावर आधारित असेल, असे यावेळी त्याने सांगितले.
 
हुंडा या विषयाशी संबंधित ठोस काही हाती आल्यास ह्या विषयावरही चित्रपट करायला आवडेल, असे काही दिवसांपूर्वीच अक्षय म्हणाला होता. देशातील छोटी-छोटी गावे आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करुन देतात. गाव हे आपल्या वडिलांसारखे असते आणि शहर हे तरुण मुलांसारखे. आपल्या वडिलांची काळजी घेणे आणि त्यांची सेवा करणे हे तरुण मुलाचे कर्तव्य आहे. तसेच हुशार माणसे नेहमी शहरातच असतात असे नसते. गावातसुद्धा अनेक हुशार माणसे आहेत, असे अक्षयने सांगितले.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments