Festival Posters

गमावण्यासारखं आता माझ्याकडे काहीच नाही-कंगना

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:16 IST)
कंगना राणावत हिने तिच्या मुलाखतीतून अनेक कलाकारांवर केलेल्या आरोपामुळे ती चांगलीच वादात सापडली आहे. कंगनाने तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये बरंच नाव कमवलं आणि तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले.
 
सिने इंडस्ट्रीतील अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे. अशात ‘माझं करिअर संपलं तरी, माझ्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही. कारण माझ्याकडे आयुष्यभरातील माझ्या यशाची कहाणी आहे’.
 
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘मी संघर्षाच्या दिवसात माझ्या भीतीवर वर्चस्व मिळवले आणि स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला. आता मी माझ्या कामगिरीवर पूर्णपणे संतुष्ट आहे. मी कोणत्याही माहितीशिवाय १५ वर्षांची असताना घर सोडले होते. पण आता ३० वर्षांची झाल्यावर मी माझ्याबाबतीत खूपकाही जाणून आहे’.
 
ती म्हणाली की, ‘मी तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत आणि मी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. आता मी स्वत:ला ओळखले आहे. इथे माझं करिअर संपलं तरी माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. आयुष्यभरासाठी मी मिळवलेल्या यशाची कहाणी माझ्याकडे आहे’. भीतीबाबत कंगना सांगते की, ‘मला भीती का वाटावी? मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मला आत्मनिर्भर व्हायचं होतं. आता मी एक मेगास्टार आहे. जर मला भीती वाटली तर मी आयुष्यभर तेच फिल करत राहणार. त्यामुळे संपण्याची मला भीती नाही. मला माझ्या क्षमतांवर विश्वास आहे’. कंगनाने सांगितले की, ‘मी मनालीमध्ये एक सुंदर घर तयार केलं आहे. मला तिथे वेळ घालवायचा आहे. पुस्तक लिहायचं आहे आणि मला एका सिनेमाचं दिग्दर्शन करायचं आहे’.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

संजय लीला भन्साळी रुग्णालयात का गेले? कुटुंबाने निवेदन जारी करून गुपित उलगडले

महाराष्ट्रात रंगपंचमीचा खरा आनंद लुटायचा असेल तर या ३ विशेष ठिकाणांना नक्की भेट द्या

अक्षय कुमारच्या "भूत बांगला" मधील "रामजी आके भला करेंगे" या गाण्याचा टीझर प्रदर्शित

विजय-रश्मिकाच्या लग्नात पाहुण्यांना जपानी जेवण मिळणार, 'नो फोन' धोरण लागू

'स्प्लिट्सव्हिला ७' फेम मयंक पवार यांचे निधन

पुढील लेख
Show comments