Marathi Biodata Maker

'निरमा' वाद वाढला, मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार

Webdunia
गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:28 IST)
वॉशिंग पावडर 'निरमा'च्या जाहिरातीतून कंपनी आणि अक्षय कुमार यांनी मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली. जाहिरातीसाठी मराठा सैन्याचे विकृत चित्रीकरण केल्याने शिवप्रेमींने कंपनी आणि अक्षय कुमारला धारेवर धरले आहे. 
 
सोशल मीडियावर याच्याविरोधात #BoycottNirma ApologizeAkshay #ApologizeNirma आदी हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसेच यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकांनी अक्षयकडे जाहिरात केल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे.
 
निरमा पावडरच्या या जाहिरातीमध्ये अक्षयकुमार आणि सहकलाकारांनी मावळ्यांचा वेष परिधान केला आहे. यात राजेच्या भूमिकते अक्षयकुमार युद्ध जिंकून येतो परंतू मळलेले कपडे बघून महाराणींकडून आम्हाला पुन्हा कपडे धुवावे लागणार असे म्हटले जाते. यावर जसे शत्रूला धुता येते तसे कपडेही धुता येतात असे म्हणत अक्षयकुमार व सहकलाकार नाचत- नाचत निरमाने कपडे धुतात. 
 
या अशा जाहिरातीवर लोकांने संताप व्यक्त केला आहे. या वादग्रस्त जाहिरातीमुळे मुंबईतील एका संघटनेकडून अक्षयकुमार विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र अक्षयने माफी मागितली असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

पुढील लेख
Show comments