Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्रपाली जेव्हा गौतम बुद्धांवर मोहित झाली तेव्हा काय झाले?

amrapali and buddha story
Webdunia
गुरूवार, 23 मे 2024 (06:28 IST)
गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांनी चार आर्य सत्य, आष्टांगिक मार्गातील मध्यम मार्ग दाखवला. त्यांच्यासोबत दहा हजार भिक्षू एकाच वेळी राहत असत. आम्रपालीने महिलांना भिक्षुणी बनण्याचा मार्ग मोकळा करण्यात मदत केल्याचे सांगितले जाते.
 
गौतम बुद्ध आणि आम्रपाली यांच्याबद्दल काही खास जाणून घेऊया-
1. आंब्याच्या झाडाखाली भेटली आम्रपाली: बिहारमध्ये वैशाली नावाचा एक जिल्हा आहे. नगर वधू आम्रपाली आणि येथील राजांच्या कथांनी इतिहास भरलेला आहे. एका गरीब जोडप्याला आंब्याच्या झाडाखाली एक निष्पाप मुलगी सापडल्याचे सांगितले जाते. तिचे पालक कोण होते आणि त्यांनी तिला आंब्याच्या झाडाच्या पायथ्याशी का सोडले हे माहित नाही. ती आंब्याच्या झाडाखाली सापडल्यामुळे तिला आम्रपाली असे नाव पडले.
 
2. जेव्हा तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरली: आम्रपाली जेव्हा तरुणावस्थेत पोहोचली तेव्हा तिच्या रुप आणि सौंदर्याची चर्चा शहरात पसरली. शहरातील प्रत्येक पुरुष तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक होता. राजापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच आम्रपाली हवी होती. आता तिच्या आई-वडील कोंडीत पडले आणि त्यांना भीती वाटू लागली. आम्रपालीने कोणाचीही निवड केली असती तर राज्यात अशांतता पसरली असती.
 
3. अशाप्रकारे नगरवधू बनले: जेव्हा वैशालीच्या शाही प्रशासनाला याची माहिती मिळाली, तेव्हा शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्रपालीला नगरवधू बनवण्यात आले. आम्रपालीला 7 वर्षांसाठी जनपथ कल्याणी ही पदवी देण्यात आली होती. हे साम्राज्यातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान स्त्रीला दिली जात असे.
 
4. आम्रपाली तिच्या स्वतःच्या महाल आणि दासींनी वेढलेली राहायची: ती नगरवधू बनली आणि जनपथ कल्याणी ही पदवी मिळवताच तिला एक आलिशान राजवाडा आणि तिची देखभाल करण्यासाठी नोकर आणि दासी मिळाल्या. आम्रपालीला पूर्ण स्वातंत्र्य होते. तिला लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकारही मिळाला. यासोबतच ती दरबार नर्तकीही झाली.
 
5. तिच्या सौंदर्याची चर्चा दूरवरच्या देशांमध्ये होती: आम्रपालीच्या सौंदर्याची जगभर प्रसिद्धी होती आणि त्यावेळी तिची एक झलक पाहण्यासाठी दूरदूरच्या देशांतून अनेक राजपुत्र तिच्या महालाभोवती तळ ठोकून असायचे. त्यांच्या वाड्याभोवती सतत हालचाली सुरू होत्या. त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक जवान तैनात करण्यात आले होते. आम्रपाली मिळवण्यासाठी मगधचा राजा बिंबिसार याने वैशालीवर हल्ला केला होता असे म्हणतात. आम्रपाली बिंबिसाराच्या मुलाची आई झाली. पुढे बिंबिसाराचा मुलगाही आम्रपालीच्या प्रेमात पडला होता, असेही म्हटले जाते.
 
6. एके दिवशी गौतम बुद्ध शहरात आले: वैशालीमध्ये गौतम बुद्धांच्या पहिल्या दर्शनाची कीर्ती ऐकून, आम्रपाली सोळा श्रृंगार करुन तिच्या अनेक सेवक आणि दासींसह गंडक नदीच्या काठी पोहोचली. तिला गौतम बुद्धांना भेटायचे होते. तिला तेथे बघून भिक्षूंमध्ये एकच गोंधळ उडाला.
 
7. बुद्धाने भिक्षूंना इशारा दिला: असे म्हणतात की आम्रपालीला पाहिल्यानंतर बुद्धांना आपल्या शिष्यांना डोळे बंद किंवा नजर खाली करण्यास सांगावे लागले, कारण भगवान बुद्धांना माहित होते की आम्रपालीचे सौंदर्य पाहून त्यांच्या शिष्यांना संतुलन राखणे कठीण होईल. त्याचा संन्यास संपेल. ते मार्गापासून दूर जातील.
 
8. आम्रपालीने बुद्धाचे स्वागत केले: असे म्हटले जाते की ज्ञानप्राप्तीनंतर 5 वर्षांनी भगवान बुद्ध वैशाली येथे आले आणि त्यांचे स्वागत प्रसिद्ध शाही नृत्यांगना आम्रपालीने केले. बौद्ध धर्माच्या इतिहासात, आम्रपालीद्वारे आपल्या आम्रकानानमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना आमंत्रित करुन भोजन केल्यानंतर त्यांना दक्षिणा म्हणून अर्पण करण्याची मोठी कीर्ती आहे.
 
9. आम्रपाली भिक्षूवर मोहित होती: असे देखील म्हटले जाते की आम्रपाली एका बौद्ध भिक्षूवर मोहित झाली होती. आम्रपालीने बौद्ध भिक्षूला फक्त जेवणासाठी आमंत्रित केले नाही तर 4 महिने राहण्याची विनंतीही केली. बौद्ध भिक्षूने उत्तर दिले की तो त्याच्या गुरु बुद्धांच्या परवानगीनंतरच असे करू शकतो. असे म्हणतात की गौतम बुद्धाने त्या भिक्षुला आम्रपालीसोबत 4 महिने राहण्याची परवानगी दिली होती. शेवटी आम्रपालीने गौतम बुद्धांना सांगितले की मी तुमच्या साधूला मोहित करू शकत नाही आणि त्यांच्या अध्यात्माने मला मोहित केले आहे आणि मला धम्माच्या मार्गावर चालण्यास भाग पाडले आहे.
 
10. भिक्षुणी बनली आम्रपाली : आम्रपालीने गौतम बुद्धांसमक्ष भिक्षु बनण्याची इच्छा प्रकट केल्यावर आधीतर बुद्धांने यासाठी नकार दिला. तथापि या घटनेनंतरच बुद्धांनी महिलांना बौद्ध संघात प्रवेश देण्याची परवानगी दिली. आम्रपाली नंतर एक सामान्य बौद्ध भिक्षुणी बनली बनली आणि तिने वैशालीच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी केल्या. तिने आपले केस कापले आणि भिक्षा पात्र घेऊन एका सामान्य भिक्षुणीचे जीवन जगले.
 
अस्वीकरण: वरील माहिती ऐकीव आणि लोकप्रिय समजुतीवर आधारित आहे. धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग किंवा पुष्टी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सर्व शुभ कामे अबुझ मुहूर्तावर होतील, तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Anang Trayodashi 2025 आकर्षण वाढविण्यासाठी आणि प्रेमात यश मिळवण्यासाठी अनंग त्रयोदशी व्रत विधी आणि कथा

मारुतीला प्रिय आहेत या ४ राशी, सुख-समृद्धीची कधीच कमतरता भासत नाही

मारुतीच्या नावावरून मुलांची नावे

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments