Festival Posters

आतापर्यंत १ लाख अधिक रुग्ण होऊन घरी

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (08:54 IST)
राज्यात कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार  ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments