Dharma Sangrah

राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:50 IST)
राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८४,७६८ झाली आहे. राज्यात ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,३३६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ४, नाशिक ६, पुणे ३, सोलापूर ३, नागपूर ४ व अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू नाशिक ६, ठाणे ४, कोल्हापूर २,नागपूर १, सिंधुदुर्ग १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
तर ३,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८,८१,०८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला

नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली; "नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही," असे कोर्टाने स्पष्ट केले

पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला; मंत्री आता ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठका घेणार

आई की वैरीण! आठ महिन्यांच्या चिमुकलीला पाजले ॲसिड, प्रकृती गंभीर

शेतकरी कर्जमाफी योजना आचारसंहितेमुळे रखडली, बळीराजा'मध्ये व्यापक असंतोष निर्माण

पुढील लेख
Show comments