Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:37 IST)
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली आकडेवारी  काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर  मृत्यूसंख्या देखील वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील २ दिवसात राज्यात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती परंतु गुरुवारी राज्यात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा सध्या १.८२ टक्के इतका आहे. असले तरी राज्यात काळजी करण्याचे कारण नाही. कारण बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
 
राज्यात गुरुवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २ हजार ९६३ इतकी आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात सध्या २२ हजार २३५ व्यक्ती या होम क्वारंटाइन असून ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments