Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:28 IST)
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश सरकारकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शनिवार ते सोमवार जारी करण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३८ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८१ हजार ५२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
दिवसभरात राज्यातील २ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील १९ लाख ८७ हजार ८०४ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४० हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५५ लाख २१ हजार १९८ प्रयोगशाळा नमनुयांपैकी २० लाख ८१ हजार ५२० (१३.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख १६ हजार ९०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments