suvichar

दिलासा : राज्यात शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (07:32 IST)
मुंबईनंतर राज्यात शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्य कमी झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा घटली आहे. मुंबईत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक वेळा शून्य कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातही शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी  २५१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १.८२ टक्के एवढा मृत्यूदर आहे.
 
तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२०,९२२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९% एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण २ हजार ५२४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर ७८ लाख ७१ हजार २०२ कोरोनाबाधितांची आजपर्यंत नोंद झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे या ठिकाणी अद्याप निर्बध शिथिल करण्यात आले नाही. केवळ अल्प प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत.
 
मुंबईत ४४ कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठा घट झाला असल्याचे दिसत आहे. रविवारीमुंबईत फक्त ४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे सर्व ठिकाणे १०० टक्क्यांनी सुरु करण्यात आले आहेत. मुंबईत रविवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून अनेक दिवस मुंबईतील कोरोनाबाधितांची नोंद शून्यावर होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

नीट पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारला पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क,जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली

अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत योजना राबविण्यात आली, १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments