Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (10:25 IST)
कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई  १५१
पुणे (शहर व ग्रामीण भाग) ४८
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६
नागपूर १६
यवतमाळ ४
अहमदनगर ८
बुलढाणा ३
सातारा, कोल्हापूर प्रत्येकी  २
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी  १
इतर राज्य - गुजरात १
 
एकूण ३०२ त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू
 
राज्यात एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

CSK vs PBKS : चेन्नईसुपर किंग्जला पंजाबकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार

LIVE: वर्धा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे अध्यक्ष सहदेव बेटकर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

2029 नंतरही मोदी पंतप्रधान राहतील आणि देशाचे नेतृत्व करत राहतील, फडणवीसांचे विधान

पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ध्येय घेत माजी क्रिकेटपटू केदार जाधव भाजप मध्ये सामील

पुढील लेख
Show comments