Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार : टोपे

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (23:58 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पाडली. या बैठकीत टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्यासह इतर सदस्य उपस्थितीत होते. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल व्हावेत आणि उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील नियम राहावेत असा प्रस्ताव  मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत राज्यातील निर्बंध शिथिलतेबाबत अधिकृत निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
 
राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘राज्यातील २५ जिल्हे असे आहेत, जिथे पॉझिटिव्हीटी रेट आणि रुग्णवाढीचा दर कमी आहे. त्यामुळे येथील निर्बंध शिथिल करण्याचा सकारात्मक निर्णय झाला आहे. 
 
या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार…
 
मुंबई, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ
 
या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार…
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments