Festival Posters

कोरोनातून जगाला कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल : महिंद्रा

Webdunia
गुरूवार, 5 मार्च 2020 (14:38 IST)
चीनमधून पसरण्यास सुरू झालेल्या कोरोना व्हारसने जगभरात दहशत माजवली आहे. या परिस्थितीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, असे मत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. सध्या आलेले संकट एक दिवस निघून जाईल, पण यामुळे आपल्याला एक कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले.
 
सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यावर आनंद महिंद्रा म्हणाले, ' या परिस्थितीत आपण काही गोष्टी नक्कीच  शिकू. पहिली म्हणजे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढेल, डिजिटल कॉन्फरन्स वाढतील, मीटिंगच ऐवजी व्हिडिओ कॉल्स होतील आणि कमी हवाई वाहतूक होईल, ज्याने प्रदूषण टाळता येईल.' यासोबतच आपण आणखी काय-काय करू शकतो याबाबतही त्यांनी सोशल मीडियावर विचारणा केली.
 
गुगलने आयर्लंडची राजधानी डबलिनमधील मुख्यालयात हजारो कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे मुख्यालय रिकामे दिसून आले. एका कर्मचार्‍यामध्ये काही लक्षणे दिसून आली होती. हा कोरोना व्हायरसच असल्याचे स्पष्ट नव्हते. पण व्यवस्थापनाने तातडीने पुढील सूचना मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. ट्विटरनेही जगभरातील आपल्या 5 हजार कर्मचार्‍यांना शक्य तसे घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधून सुरू झालेल्या या व्हारसने विश्व व्यापले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी म्हणून घरातून काम करण्याची मुभा देत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments