Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात काेराेनाचे ३ हजार ८११ रुग्णांचे निदान

Webdunia
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (08:27 IST)
राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के झाले असून, सध्याचा मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या ६२ हजार ७४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
 
राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.
 
सध्या ५ लाख २ हजार ३६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३ हजार ७३० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्याच्या एकूण काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुरुष रुग्ण ६१ तर महिला रुग्ण ३९ टक्के आहेत. लिंगनिहाय मृत्यूचे प्रमाण पुरुष ६५, तर महिला ३५ टक्के असे आहे. अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७ टक्के असून, अतिजोखमीच्या आजारांचे बळी ७० टक्के आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments