Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही.. जाणून घ्या सत्य...

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (15:52 IST)
जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकं घाबरलेले आहेत. सोशल मीडियावर याहून बचावासाठी अनेक उपचार व्हायरल होत आहे. अशात एक दावा केला जात आहे की कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी व्यक्तीचा घसा नेहमी ओलसर असावा. आणि यासाठी प्रत्येक 15 मिनिटाने पाणी पिणे फायदेशीर ठरेल. 
 
काय आहे व्हायरल- 
व्हायरल पोस्टामध्ये लिहिले आहे की- “COVID-19 रुग्णांवर उपचार करणार्‍या जपानी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला. सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की आपलं तोंड आणि घसा ओलसर असावा, घशात कोरड पडू नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक 15 मिनिटाला किमान एक घोट पाणी पीत राहावं. अशात व्हायरस आपल्या तोंडात पोहचलं असल्यास तरळ पदार्थामुळे पोटात निघून जाईल आणि पोटात अॅसिड व्हायरसला नष्ट करेल. आणि आपण नियमित पुरेसं पाणी पीत नसाल तर व्हायरस आपल्या विंडपाइप आणि नंतर फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. हे अत्यंत धोकादायक आहे.
काय आहे सत्य-
व्हायरस पोस्ट भ्रामक असल्याचे आढळून येतं. WHO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटहून ट्विट करत हा दावा नाकारला आहे की हायड्रेटेड राहणे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतू याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची खात्री घेता येत नाही.


 


 
जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने देखील कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सतत पाणी पिण्याचा सल्ला देणारा सल्ला दिलेला नाही.
 
वेबदुनिया तपासणीत आढळले की प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याचा दावा फेक आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख