Dharma Sangrah

आई वडिलांसारखी आमची काळजी घेतली : वर्धेतून निघताना कामगारांनी व्यक्त केल्या भावना

Webdunia
सोमवार, 4 मे 2020 (10:09 IST)
लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रावासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा या कामगाराने  व्यक्त केली.

लखनऊला जाणारी रेल्वे गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 6 वाजता सुटली. यामध्ये वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या 220 कामगारांना आज विशेष बसगाड्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचवण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधिक्षक बसवराज तेली, मुख्य कार्याकारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ सचिन पावडे, प्रदीप बजाज  यांनी नवजीवन छात्रावास येथे कामगारांना निरोप दिला. यावेळी काही कामगारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन आम्ही जात आाहोत आाणि हा पाहुणचार आमच्या कायम लक्षात राहील. या जिल्ह्याची ही खासियत आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगू असे श्री वर्मा यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार नाहीत, निवडणूक आयोगाने दिली स्थगिती

"महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर असतील," भाजपच्या मंत्रींचा दावा

LIVE: "महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल,"-मंत्री चंद्रकांत पाटील

भंडारा जिल्ह्यात जांबमध्ये बिबट्याचा दहशत, शेतात बांधलेल्या वासरूला बनवली शिकार

भंडारा : मालमत्तेच्या वादातून जावयाने सासऱ्याची हत्या केली

पुढील लेख
Show comments