Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, 'या' शहरात तब्बल सहा लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज

hyderabad
Webdunia
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (15:22 IST)
हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) या संस्थेने कोरोनाचा फैलाव जाणून घेण्यासाठी शहरातील सांडपाण्याची चाचणी केली आहे. मागच्या ३५ दिवसांपासून सांडपाण्याचे नमुने तपासले जात आहेत, या चाचणीतून तब्बल सहा लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. ही संख्या तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा सहापटीने अधिक आहे.
 
CSIR-CCMB आणि CSIR-IICT या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात मलनिस्सारण वाहिन्यातील नमुने गोळा केले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या विष्ठेत कोरोनाच्या विषाणूचे अंश असतात. याच आधारावर हैदराबाद येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ८० टक्के प्लँटमधून नमुने गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास २ लाख लोकांच्या विष्ठेत कोरोना विषाणूचे कण दिसून आले आहेत. मानवी विष्ठेत ३५ दिवसांपर्यंत कोरोना विषाणूचे कण आढळून येतात. धक्कादायक बाब म्हणजे संपुर्ण तेलंगणा राज्याची कोरोनाबाधितांची संख्या ही एक लाखाच्या घरात असताना राजधानी हैदराबादमधील हे सर्वेक्षण खळबळजनक असे आहे.
 
तेलंगणा राज्यात ९७,४२४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१,५०९ रुग्णांवर उपचार सुरु असून ७५,१८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाचे आरोग्य मंत्री इटेला राजेंद्र यांनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. याचा अर्थ कोरोना आता कमी होत आहे. CCMB आणि ICMR ने सर्वेक्षण केले आहे, मात्र ते आकलनाच्या पलीकडचे आहे. कारण मला तरी कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यूदर कमी होताना दिसतोय.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

मलेशियात गॅस पाईपलाईन फुटली, भीषण आगीत 100 हून अधिक लोक मृत्युमुखी

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

प्री वेडिंग शूट नंतर वर आवडला नाही, तिने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली, आरोपींना अटक

रतन टाटांची शेवटची इच्छा काय होती, ३८०० कोटी रुपये कसे वाटले जातील: कोणाला काय मिळेल?

व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी

पुढील लेख