Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण

Webdunia
शुक्रवार, 21 मे 2021 (08:43 IST)
राज्यात गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. पण कोरोना मृत्यूचा आकडा हा बुधवारच्या तुलनेत वाढला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ९७ हजार ४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान कोविड-१९ टँकरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ५९ लाख ५६ हजार ४०६वर पोहोचली आहे. यापैकी २ लाख ८९ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी २५ लाख ८० हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त आहेत. देशात सध्या ३० लाख ७५ हजार ९७८ सक्रिय रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments