rashifal-2026

55 देशांना भारत करणार ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (22:37 IST)
करोनाने जगभरात थैमान घातले असून सर्वच देश या व्हायरसला लढा देत आहे. अशात भारत अनेक देशांना मदतीचा हात देत आहे. भारताने एक मोठा निर्णय घेत 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करणार आहे. केंद्र सरकारने याबाबद मान्यता दिली आहे. 
 
याहून गर्वाची बाब काय असेल जेव्हा संपूर्ण जग करोनाला झुंज देत असताना भारत इतर देशांच्या मदतीसाठी धाव घेत आहे. सरकारने 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.
 
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाविरुद्ध लढ्यात भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. 
 
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषधं करोना व्हायरसवरही प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी असल्याचं समोर आलं होतं. भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता केंद्र सरकारने पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना: स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याने ७ कामगारांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे लष्करी वाहन दरीत कोसळले, १० जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

BMC Mayor Reservation Controversy मुंबई महापौरपदाच्या आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांच्या गटाने मंत्रालयात गोंधळ घातला!

योगी - मोदी टार्गेट करताय, शिंदे बनावट हिंदू असल्याचे भासवताय, संजय राऊत यांनी शंकराचार्य वादावर राजकीय बाण सोडला

२०३२ नंतर दिल्ली नव्हे तर नागपूर भारताची राजधानी असेल! सर्वात प्रबळ दावेदार का ?

पुढील लेख
Show comments