Dharma Sangrah

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध सुरु,काय सुरु आणि काय बंद असणार जाणून घ्या

Webdunia
रविवार, 27 जून 2021 (15:31 IST)
कोरोनाचा उद्रेक अद्याप संपलेला नाही. दरम्यान, कोविड 19 साठी देण्यात येणारी सूट कमी करून पुन्हा निर्बंध वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला.वास्तविक,राज्यात डेल्टा प्लस प्रकार आढळल्यानंतर राज्य सरकारने कोरोनासंबंधी निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 मधील प्रकरणे कमी झाल्यावर राज्य सरकारने यापूर्वी पाच-स्तरीय अनलॉकची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु आता सरकारने ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवार पासून हे निर्बंध लावण्यात येतील.
 
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने पाच स्तरावरील विश्रांती योजनेला तीन पातळीवर मर्यादा घातल्या आहेत.जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने पाच स्तरीय अनलॉक योजना जाहीर केली होती.राज्यात आढळणार्‍या दैनंदिन कोरोना प्रकरणात घट झाली आहे. 
 
त्यानंतर विविध जिल्ह्यांना अधिकाधिक उघडण्यास परवानगी दिली जाईल असा निर्णय घेण्यात आला. तथापि, जेथे जास्त सकारात्मक प्रकरणे होती तेथे अजूनही निर्बंध कायम होते. परंतु आता जिल्ह्यांनाही पूर्णपणे सूट मिळणार नाही. राज्यात कोरोनावर तयार झालेले टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने डेल्ट प्लस व्हेरिएंट हलके घेऊ शकत नाही असे निर्देश दिले आहेत.त्यामुळे निर्बंध लादण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 
 
जाणून घेऊ या काय सुरु असणार आहे आणि काय बंद 
 
सर्व प्रकारच्या दुकानी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत उघडणार,अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या दुकानी शनिवारी आणि रविवारी बंद असतील,मॉल्स,चित्रपट गृहे पूर्णपणे बंद,सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मुभा,उपहार गृहे दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने उघडणार आणि 5 वाजे  नंतर घरपोच सेवा सुरु असणार.
 
 सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहणार.उभे राहून प्रवास करण्यास मनाई,बागेत व्यायाम करण्यास, चालण्यास सकाळी 5 ते 9 सायकल चालविण्यास परवानगी देण्यात आली,खासगी कार्यालये दुपारी 4 पर्यंतच 50 टक्के क्षमतेने सुरु असणार,सलून,ब्युटी,पार्लर,दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु असणार,चित्रीकरण करण्यासाठी सर्व नियमांना पाळून संध्याकाळी 5 वाजे पर्यंत बबल मध्ये परवानगी देण्यात आली.
 
सांस्कृतिक कार्यक्रम स्तर चार आणि पाच वगळता 50 टक्क्याच्या क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील.शनिवार रविवार बंद राहील.वैवाहिक समारंभांना 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती असणार.व्यायाम शाळा 50 टक्क्याच्या क्षमतेने दुपारी 4 वाजे पर्यंत सुरु,स्तर 3 मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू आणि स्तर 4 आणि 5 मध्ये अत्यावश्यक वस्तूंचे वितरण सुरु असणार,अत्यावश्यक सेवा वगळून रेल्वे प्रवासाला परवानगी नाही, 
 
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने पाच स्तरावरील विश्रांती योजनेला तीन पातळीवर मर्यादा घातल्या आहेत.या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की राज्यात देण्यात आलेली जास्तीत जास्त सूट आता मागे घेण्यात आली आहे. राज्यात कोरोनावर तयार झालेले टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने डेल्ट प्लस व्हेरिएंट हलके घेऊ शकत नाही असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निर्बंध लादण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मोफत पाणीपुरी देण्यास नकार दिल्याने दुकानदाराची हत्या

LIVE: माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

हॉटेलमधील चुकीच्या खोलीत गेलेल्या नर्सवर मद्यधुंद तीन जणांकडून सामूहिक दुष्कर्म; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

IND vs SA यांच्यातील 5 वा T20 मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेला ८ जागा देऊ केल्या

पुढील लेख
Show comments