Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात चोवीस तासात 900 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी, प्रकरणे पुन्हा वाढली

Webdunia
बुधवार, 5 मे 2021 (22:44 IST)
राज्यात कोरोना विषाणूची 57640 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . यासह राज्यात कोरोना विषाणूमुळे 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 57006 लोकही बरे झाले आहेत. राज्यात 57 हजार पेक्षा अधिक नवीन रुग्णांसह संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 4,880,542 वर पोहोचली  आहे. त्याचबरोबर 900 हून अधिक मृत्यूनंतर राज्यात आतापर्यंत 72662 रुग्ण मृत्यूमुखी झाले आहेत. 
आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसात राज्यात 279200 चाचण्या घेण्यात आल्या. यासह राज्यात आतापर्यंत 28384582 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किरकोळ दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत सुमारे 4000 नवीन रुग्ण  आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 3882 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे. तर साथीच्या रोगाने आणखी 77 रुग्ण दगावले आहे.  
 
औरंगाबादमध्ये 981 नवीन प्रकरणे-
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 981 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि त्यासह महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संक्रमित होण्याची एकूण संख्या 127958 वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्ह्यात संक्रमणामुळे आणखी 43 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 2631 वर गेली.
 नवीन एकूण 981 प्रकरणांपैकी शहरात 374 प्रकरणे आणि गावात 607 प्रकरणांची नोंद झाली आहे. 
आतापर्यंत जिल्ह्यातील 115535 लोक या आजारातून मुक्त झाले आहेत.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments