rashifal-2026

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:27 IST)
राज्यासह मुंबईत आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय असे चित्र समोर येत असलेल्या  आकडेवारीतून दिसून येत आहे. त्या  मुंबईकरांना तर मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात नवीन वर्षात  फेब्रुवारी महिन्यात आतापर्यत चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर घटत चालला आहे. हा महापालिकेसह मुंबईकरांना दिलासा आहे.
 
मुंबईत तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती.त्यानंतर 16 आणि 17 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.  20 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली असल्याने फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा ही नोंद झालेली आहे. शून्य मृत्यूची नोंद या महिन्यात आणखीन\ होण्याची शक्यता आहे.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ ला पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर ‘डिसेंबर २०२१’ मध्ये देखील ७ वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती. आता फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 4 वेळा शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.
 
मुंबईत 169 नवे रूग्ण
मुंबईत रविवारी  169 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज 286 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यत 10 लाख 34 हजार 493 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 1 हजार 151 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख