Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूरमध्ये लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला, काय सुरू काय बंद जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (16:17 IST)
पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी माहिती दिली आहे की नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) लॉकडाऊन हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
 
आज नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंतच्या निर्बंधाबाबत निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. मात्र निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
 
नागपूरमध्ये काय सुरू, काय बंद? 
1. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली
२. भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार
३. हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा 
४. परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील 
५. शाळा आणि कॉलेज बंद राहणार
 
नागपूरमध्ये लॉकडाऊन लावल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. कालही नागपुरात ३ हजार २३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या नागपूर शहरात २ हजार ५२४ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात ७०८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांचा आकडाही गंभीर आहे. नागपूरमध्ये काल ३५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हाच वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी नागपुरातील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

LIVE: नितेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

पुढील लेख
Show comments