rashifal-2026

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (16:23 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे रायगडमधील नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी पोहोचले आहेत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी पॅकेज हा शब्द वापरणं टाळलं.
 
उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून सध्या १०० कोटींची मदत जाहीर करत आहोत. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर पुढील मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: काय स्वस्त आणि काय महाग? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या, संपूर्ण यादी पहा

१० लाख घरे आणि ६,००० किमी एक्सप्रेसवेच्या प्रमुख घोषणांसह वाधवान 'चौथी मुंबई' बनणार

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित केला आणि माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने नागरी पुरस्कार आणि स्मारकाची घोषणा केली

अर्जुन आणि सानिया विवाहबंधनात अडकले

पुढील लेख
Show comments