Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनची टंचाई

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:50 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठय़ावर आता परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून निर्माण झालेला तुटवडा सोमवारी सुरळीत होऊ शकतो, असे अन्न व औषधी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा अगदी हातघाईवर आला नसला तरी वाहतुकीमध्ये थोडा जरी अडथळा आला तरी त्याचे परिणाम होऊ शकतात. मागणी केलेला कृत्रिम प्राणवायू आणि इंजेक्शन शिल्लक उरत नसल्याने प्रशासनाच्या कसरतीचा काळ सुरू झाला आहे. दरम्यान ‘आयनॉक्स’ या एकमेव ‘ऑक्सिजन’ उत्पादन कंपनीबरोबरच आता ‘लिंडे’ व ‘जेएसडब्ल्यू’ या कंपन्यांकडूनही कृत्रिम प्राणवायू मागविण्यात आला आहे.
 
गेल्या दोन दिवसापासून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या केवळ १६० कुप्या आल्या होत्या. तत्पूर्वी हे प्रमाण २४० एवढे होते. त्यामुळे इंजेक्शनची कमतरता भासत असल्याचे विविध रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 
 
शहरातील विविध रुग्णालयांची कृत्रिम प्राणवायूची गरज सध्या ४७ टन एवढी आहे. त्यातील खासगी रुग्णालयांना होणाऱ्या पुरवठय़ाचे करार असल्याने त्यांना तो सुरळीत आहे. मात्र, काही रुग्णालयांना मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढताना धावाधाव करावी लागते. नव्याने ‘लिंडे’ कंपनीकडून होणारा ऑक्सिजन पुरवठा जालना, नांदेड आणि औरंगाबाद या शहरांसाठी होणार आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments