Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सोमवारी २,९४९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात सोमवारी २ ९४९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Webdunia
मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (09:10 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. राज्यात सोमवारी २,९४९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८३,३६५ झाली आहे. राज्यात  एकूण ७२,३८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,२६९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.
 
राज्यात सोमवारी  ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, ठाणे ३, नाशिक १२, पुणे ५, अमरावती ६, नागपूर ८ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू नशिक ११, अमरावती ६, पुणे ३, परभणी २, नांदेड २ आणि नागपूर १ असे आहेत.
 
 ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७,६१,६१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८३,३६५ (१६.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा

आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

बीड जिल्ह्यात मशिदीत मध्यरात्री रात्री मोठा स्फोट

LIVE: प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करण्याची गरज नाही, वाघ्याच्या स्मारकावर फडणवीसांचे विधान

उष्णतेमुळे महाराष्ट्रातील शाळांच्या वेळात बदल, नवीन वेळापत्रक लागू

पुढील लेख
Show comments